●ऊस
ऊस ही एक तृण वर्गीय वनस्पती आहे .उसाचा उपयोग गुळ साखर बनवण्या साठी करतात.ऊस प्रामुख्याने ब्राझिल भारत देशात जास्त पिकतो. भारतात महाराष्ट्र व उत्तरप्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृतमध्ये इक्षुुदंड असे नाव आहे.
साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे.
साखरेत केवळ कॅलरीज असतात व याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे साखरेत नसतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते. त्यामुळे हृदयविकार व डायबेटीसचा धोकाही वाढत असतो. तर गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे आहे . तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते.
Sugarcane : यंदाचा हंगाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाभदायक होणार आहे
जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचे दर प्रति क्विंटल ३५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन करणारऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ४०० रुपये जमा करावेत. तसेच १३ सप्टेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले आहे. बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव येथे आयोजित निर्धार सभेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, यावर्षी पाऊस कमी झाल्याने एकरी दहा ते बारा टनाने उत्पादनात घट होणार आहे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने जेमतेम तीन महिने चालतील. कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून महाराष्ट्रातील ऊसाची पळवापळवी होणार आहे. त्याशिवाय कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळेच यावर्षी चि हंगाम हा शेतकऱ्यांना लाभदायक असणार आहे.
Sugarcane Farmers : उसाचा दर निश्चित झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यामध्ये पाठवण्याची घाई करू नये, १३ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रसह कर्नाटक सीमा भागातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असेही ते म्हटले. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कृषी आयोगाच्या शिफारशीनुसार कारखान्यामध्ये उत्पादन होणारे इथेनॉल, ट्रान्स्पोर्ट, वीज निर्मिती या अंदाजावरून कारखान्यांनी एफआरपी देण्यास बंधनकारक केले आहे. मात्र, असे होत नसल्याने ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे, असेही खासदार राजू शेट्टी म्हटले.
बेळगाव जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने एफआरपीप्रमाणे दर टाळाटाळ करीत आहे. याबाबत साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचे दर प्रति क्विंटल ३५०० रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन करणारऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रतिटन ४०० रुपये जमा करावेत.
ऊसाच्या जाती कोणत्या?
मराठवाड्यात ऊस लागवडीसाठी को 86032, को 94012, कोसी 671, कोव्हीएसआय 9805, कोएम 265 या जातींची शिफारस केलेली आहे.
●उसाची सर्वोत्तम जात कोणती?
मानक वाणांपेक्षा 7.0-12.0% जास्त असलेले रॅटून चांगले उत्पादन देणारे आढळले. वाण लाल रॉट रोगास माफक प्रमाणात प्रतिरोधक आहे. ऊस मध्यम जाड व हिरवट-पांढरा रंगाचा असतो.
●ऊस लागवड खत व्यवस्थापन
सुरू हंगामातील ऊसाची ही लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. या लागवडीत हिरवळीचे खत आंतरपीक म्हणून घेऊन बाळ बांधणी करताना जमिनीमध्ये गाडावे. त्यामुळे जमीन सुपीकता वाढण्यास मदत होईल.
1)त्यामुळे मोठ्या बांधकामाच्या वेळी 40 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद आणि 50 टक्के पालाश द्यावे.
2) मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही.
3) सल्फरचा वापर - गंधक हा दुय्यम घटक असला तरी त्याचा वापर उसासाठी महत्त्वाचा आहे.
लागवडीच्या वेळी 24 किलो एलिमेंटल सल्फर प्रति एकर शेणखतामध्ये मिसळावे.
सुरू हंगामातील उसासाठी हेक्टरी २५० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाशची शिफारस आहे
रासायनिक खतमात्रेत माती परिक्षण करून योय ते बदल करणे गरजेचे आहे. माती परीक्षणामुळे जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश यासोबतच सूक्ष्मअन्नद्रव्यांची स्थिती देखील आपल्याला समजते. त्यावरून रासायनिक खत मात्रा ठरवणे सोपे जाते .
को- ८६०३२ या मध्यम उशीरा पक्व होणाऱ्या जातील अन्नद्रव्यांची जास्त गरज असते. या जातीस नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांची २५ % जास्त मात्रा लागते (नत्र ३१३ किलो, स्फुरद व पालाश प्रत्येकी १४४ किलो).
खताचा पहिला हप्ता म्हणजेच १० % नत्र लागवडीपूर्वी, मुळांच्या व अंकुराच्या वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० % फायदेशीर ठरते.
लागवडीनंतर ६ – ८ आठवड्यांत उसाला फुटवा येण्यास सुरुवात होते. फुटव्यांची वाढ अधिक जोमदार होण्यासाठी नत्र खताची ४० % मात्रा द्यावी. त्यानंतर अवजाराच्या साह्याने बाळबांधणी करावी. बाळबांधणी केल्यामुळे खते व्यवस्थितरित्या जमिनीमध्ये गाडली जातात. तसेच उसाच्या मुळाला हलकीशी भर दिली जाते. त्यामुळे फुटवा चांगला लागतो व जोमदार वाढ होते.
पीक १२ – १४ आठवड्यांचे झाल्यानंतर उसाला कांड्या सुटण्यास सुरुवात होते. त्यावेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीत १० % नत्राची मात्रा द्यावी.
अवजाराच्या साह्याने हातपेरणी करावी अथवा उसाच्या बुडाला खत देऊन तीन दातेरी अवजार चालवावे. म्हणजे खत मातीआड होईल व जमीन मोकळी होईल.
लागवडीनंतर ३.५ – ४ महिन्यांत उसाची पक्की बांधणी करून घ्यावी. मोठी बांधणी करताना प्रथम शिफारशीप्रमाणे नत्रयुक्त खतांची ४० %, स्फुरद व पालाशची उर्वरीत प्रत्येकी ५० % मात्रा उसाच्या बुडाला देऊन तीन दातेरी अवजार चालवावे. त्यानंतर रिझरच्या साह्याने बांधणी करावी, म्हणजे उसाला चांगली भर मिळेल .
रासायनिक खतांच्या मात्रा प्रत्येक वेळी सेंद्रिय बरोबर देणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता वाटल्यास द्रवरूप खतांची फवारणी करावी. व पाऊस पडल्यानंतर लगेच खतांचा शेवटचा हप्ता द्यावा.
●ऊस तणनाशक
ऊसाची लागण झाल्यानंतर 3 – 5 दिवसांनी ॲट्राटूप हे तणनाशक जमीन वापश्यावर असतांना हेक्टरी 5 किलो 500 लिटर पाण्यातून सर्वत्र फवारावे. त्यानंतर मोठ्या बांधणीपर्यत आवश्यकतेनुसार एक खुरपणी व एक अथवा दोन कुळपण्या कराव्यात. फवारणी करताना ढगाळ, पावसाळी वातावरण असताना फवारणी करू नये.
●ऊस वाढीसाठी फवारणी
ऊस उत्पादनावर चांगला परिणाम होतो. मल्टिमायक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताच्या उसाच्या पानांवर 2 फवारण्या कराव्यात. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खतात लोह(२.५ %), मॅंगेनीज(१.० %), जस्त(३.० %), तांबे (१.० %),मॉलिब्डेनम (०.१ %) व बोरॉन (०.५ %) ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.
●ऊसाचा रस उपयोग
1) ऊसाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. …
2)मधुमेहासाठी फायदेशीर – ऊसाचा रस शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतो. …
3)रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते – ऊसाचा रस रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. …
4)वजन कमी करण्यास मदत करते – ऊसाच्या रसामध्ये भरपूर फायबर असते.
ऊसापासून गुळ:
ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या ठिकाणाला ‘गुऱ्हाळ’ असे म्हणतात. खाद्यपदार्थास गोड चव येण्यासाठी गुळाचा वापर करतात. साखरेचा शोध लागण्यापूर्वी, पक्वान्ने बनविण्यासाठी भारतात गूळ वापरला जात होता . आजही, भारतीय स्वयंपाकघरामध्ये गूळ ही एक आवश्यक बाब आहे.
ऊस रस मशीन किंमत कमीत कमी 6200 ते 7799 जास्तीत जास्त आहे.
●ऊसापासून साखर कशी बनवतात?
सर्वप्रथम ऊस कारखान्यात दाखल होतो. त्यांनतर गेट वर त्याचे वजन होते. तिथून ऊसाची गाडी अनलोड होण्यासाठी केन अनलोडर जवळ जाते. तिथे ऊस सरकत्या प्लॅटफॉर्मवर उतरवला जातो तेथून हा ऊस गव्हाणीत पडतो ( गव्हाण – एक खड्डा असतो त्यातून ऊस पुढे पुढे सरकत तुटण्यासाठी जातो )
गव्हाणीच्या एन्ड ला उसाचे तुकडे केले जातात. 5-5 फुटाचे मोठ्या दाताने उसाचे तुकडे होत असतात ( एका मिनिटात 1 टन ऊस आरामशीर तुटतो ) ते तुकडे पुढे मिल मध्ये क्रश होतात. त्यातून उसाचा सगळा रस काढून घेतला जातो व भुसा वेगळा केला जातो. तोच भुसा बॉयलर मध्ये आगी साठी वापरला जातो व बाकीचं विकला जातो ( भुसा 3 रुपये किलो )
आता हा रस पुढे प्रक्रियेसाठी पाठवला जातो. त्यात त्याच्या मधली केमिकल्स द्वारे घाण काढली जाते.
पुढे उसाचा रस काही टाक्यांमध्ये पाठवला जातो तिथे त्याला बॉयलर च्या वाफेवर रस गरम केला जातो. या प्रक्रियेत त्याच रूपांतर घट्ट पाकमध्ये होत असते. जो पर्यंत पाक साखरे योग्य होत नाही तो पर्यंत तो गरम होत असतो व टाकी मध्ये ढवळला जात असतो. एकदा पाका चे रूपांतर बारीक बारीक कनांमध्ये व्हायला लागले की ते कण बॅच मशीन मध्ये सोडली जाते. बॅच मशीन मध्ये जाताना कण एकदम गटर च्या पाण्यासारखे असतात तिथे ते स्टीम प्रेशर द्वारे धुतले जातात. धुवून झाले की ते खाली पडतात ( साखर स्वरूपात) तिथून ती साखर पुढे पुढे ढकलली जाते बारीक साखर बारीक चाळणीतून वेगळी होते व मोठी साखर मोठ्या चाळणीतून वेगळी होऊन होपर मध्ये जाऊन पडते तिथून पुढे ती पॅकिंग साठी जाते.
राहिलेली खराब शुगर थेट नंतर प्रक्रियेसाठी मशीन्स मध्ये पाठवली जाते.
सरासरी 10.30% रिकव्हरी मिळाली तर कारखाना फायद्यात राहतो ( म्हणजे100 किलो उसातून 10किलो+ साखर निघाली पाहिजे
Jaggery Vs Sugar : साखर खावी की गुळ?
आपल्या आरोग्यााठी गुळ चांगला आहे की साखर ? जाणून घ्यावी
साखर ही रोजच्या खाण्यातील गोष्ट आहे. चहा, नाश्ता अथवा गोड खाण्यामध्ये साखर ही असतेच. स्वयंपाकघरात साखरेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुर्वी साखरेच्या जागी गुळ हा वापरला जायचा. कालांतराने गुळाची जागा साखरेने घेतली. आज काही ठराविक पदार्थांमध्येच गुळ हा वापरला जातो परंतु आपल्या आरोग्यााठी गुळ चांगला आहे की साखर ? आपण साखर खावी की गुळ? हे आपण जाणून घेणार आहोत. साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे.
साखरेत केवळ कॅलरीज असतात व याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे साखरेत नसतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते. त्यामुळे हृदयविकार व डायबेटीसचा धोकाही वाढत असतो. तर गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे आहे . तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही. त्यामुळे साखर व गुळाची तुलना करता, आरोग्यासाठी गुळचं खाणे हितकारक असते.
डॉक्टर अनेकदा साखर कमी खाण्याचा सल्ला अनेकांना देतात. याऐवजी गूळाचा वापर करायला लावतात. गुळ साखरपेक्षा कसा चांगला हे आपण जाणून घेऊया.गुळाचे फायदेगूळ हा पचनसंस्थेसाठी उत्तम असतो..गूळ मध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलेनियमचे प्रमाण असते जे शरिराकरिता खूप पोषक असतात.याशिवाय गुळामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहे. त्यामुळे डॉक्टर गुळ खाण्याचा सल्ला देतात.गुळ रक्तवाढीस मदत करतं. याशिवाय गुळ दीर्घकाळापर्यंत शरीराला ऊर्जा देते.गूळाचा चहा पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.विशेषत: गुळ हा हिवाळ्यात खाणे अधिक चांगले आहे.
ऊस विकास योजना
मंत्री समितीच्या निर्णयानुसार ऊसाची रक्कम निश्चित करताना गाळप केलेल्या प्रती मेट्रीक टन ऊसामागे चार रुपये या प्रमाणात शुल्क वेगळे काढून हे पैसे विकास निधी म्हणून साखर कारखाने वसुल करतात. साखर कारखाने मार्गदर्शक नियम व तत्वांनुसार, पूर्व मान्यतेसह या निधीचा वापर ऊस विकास कार्यक्रम, सिंचनविकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व प्रसिध्दी संबंधित कार्यक्रमांसाठी करतात.
याव्यतिरिक्त साखर कारखाने, कारखान्याच्या हमीच्या आधारे राष्ट्रीयीकृत /सहकारी बँकांकडून पीक कर्ज घेवू शकतो . पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठीही कारखाने राज्य किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून पीक कर्ज घेऊ शकतात. ऊस विकास उपक्रमांतर्गत कारखाने गाळप केलेल्या ऊसाची किंमत वगळून घेतलेले कर्ज व्याजासह फेडू पण शकतात.
साखर कारखान्यांना ऊस द्यायला शिरोळमध्ये आंदोलन:
शिरोळ येथे आज ऊसप्रश्नी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर निर्धार मोर्चा काढला. त्यांनी कारखान्यांना ऊस गाळपासाठी देण्याचा निर्धार व्यक्त केला. शिरोळमध्ये तहसील कार्यालयासमोरच मंडप घालून त्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. मोर्चात ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, शेतमजूर सहभागी झाले होते.
FAQ
1) मी माझे ऊस उत्पादन कसे वाढवू शकतो?
उसाची माती कमी सुपीक बनते आणि मातीची पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे जास्त उत्पादन देऊ शकत नाहीत. म्हणून, मातीत खत आणि खतांचा समावेश करून पोषक तत्वांची भरपाई करून माती व्यवस्थापन केल्यास ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते आणि चांगल्या कापणीसाठी ते अपरिहार्य आहे.
2)उसासाठी कोणते खत चांगले आहे?
उसाची उंची आणि जाडी वाढवण्यासाठी ओळखले जाणारे एक प्रकारचे खत म्हणजे नायट्रोजन खत
3) ऊस वाढीसाठी काय करावे?
110 ते 120 दिवस ते 240 दिवस हा उसाच्या जोमदार वाढीचा कालावधी आहे. सर्वोत्तम वाढीसाठी 30 ते 32 अंश तापमान आवश्यक आहे. उगवण आणि लवकर वाढ, फुटवे टप्पा, जोमदार वाढ, परिपक्वता अशा उसाच्या वाढीच्या अवस्थेत खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. या काळात नत्र, स्फुरद, पालाश या खतांचे व्यवस्थापन करावे.
4) 1 एकरात किती टन उसाचे उत्पादन होते?
एकरी 100/150 टन ऊसाचे उत्पादन घेण्यासाठी अनेक शेतकरी जास्त ऊस वापरून दाट लागवड करतात, जड रासायनिक खतांचा वापर करून जास्त सिंचन करतात. पण परिणाम नेमके उलटेच. उत्पादन खर्च वाढल्याने उत्पादन एकरी 35 ते 40 टनांपेक्षा जास्त होत नाही. त्यामुळे जमिनीची सुपीकताही कमी होत आहे.
5)भारतात ऊस कुठे पिकतो?
भारतातील ऊस उत्पादक राज्ये
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक व्यतिरिक्त, भारतातील इतर ऊस उत्पादक राज्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात, बिहार, हरियाणा, गोवा आणि पंजाब आहेत.
6)दक्षिण आफ्रिकेत ऊस फायदेशीर आहे का?
उत्पादन वर्ष 2021/2022 मध्ये, दक्षिण आफ्रिकेतील उसाचे प्राथमिक एकूण उत्पादन मूल्य सुमारे 11.1 अब्ज दक्षिण आफ्रिकन रँड (सुमारे 650 दशलक्ष यूएस डॉलर्स) इतके होते.
7)उसाला किती पोटॅशियम लागते?
50-टन-प्रति-एकर उसाचे पीक सुमारे 350 पौंड K2O प्रति एकर घेते आणि कापणी केलेल्या देठासह सुमारे 175 पौंड K2O प्रति एकर काढले जाते.
8)उसासाठी खताचा वापर का आवश्यक आहे?
हे संपूर्ण उसामध्ये वसाहत होते आणि एकूण एन सामग्री वाढते . मातीमध्ये, ते मुळांना वसाहत करू शकते आणि फॉस्फेट, लोह आणि Zn विरघळविण्यास सक्षम आहे. हे पिकाची वाढ, उसाचे उत्पादन आणि रसातील साखरेचे प्रमाण देखील वाढवू शकते.
9)ऊस किती वेगाने वाढतो?
ऊसाची स्थापना झाल्यानंतर, तो 9-16 महिने (किंवा थंड हवामानात 18-24 महिने) वाढतो आणि जून आणि डिसेंबर महिन्यांमध्ये यांत्रिकरित्या पीक काढण्यापूर्वी चार मीटरपर्यंत उंचीवर पोहोचतो.
10)तुम्ही कॅनडामध्ये ऊस वाढवू शकता का?
ऊस कॅनडाच्या हवामानास अनुकूल नाही , परंतु साखरेचा कॉर्न देशभरात पिकवला जाऊ शकतो आणि त्याच प्रकारे वापरला जाऊ शकतो. कापणीनंतर, साखरेच्या कणीस दाबून त्याचा सुक्रोज समृद्ध रस सोडला जातो जो यीस्टद्वारे इथेनॉलमध्ये आंबवता येतो.
11)उसाचे विविध वाढीचे टप्पे कोणते आहेत?
उगवण टप्पा, 2. टिलरिंग टप्पा, 3. मोठ्या वाढीचा टप्पा, 4. परिपक्वता आणि पिकण्याचा टप्पा .
12)ऊस कसा पिकवायचा?
बर्याच खाण्यायोग्य पिकांप्रमाणेच, उसालाही चांगला निचरा आणि भरपूर पोषक तत्वे असलेली हलकी, चिकणमाती माती आवडते . उत्तम वाढीसाठी-विशेषत: कमी वाढणारा हंगाम असलेल्या प्रदेशात वृद्ध खत, कंपोस्ट आणि प्रोबायोटिक खतांनी माती सुधारण्याची शिफारस केली जाते. झाडे सक्रियपणे वाढत असताना, त्यांना भरपूर पाणी द्या.
13)भारतात उसाची शेती फायदेशीर आहे का?
असे मानले जाऊ शकते की ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक हेक्टर जमिनीत ऊस लागवडीसाठी सरासरी 1.61 लाख रुपये खर्च करावे लागतील आणि त्यातून सुमारे रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. देशभरात निव्वळ नफा म्हणून 19,880/हे .
14)सर्वात जास्त साखर उत्पादक कोण आहे?
भारत , जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश, जागतिक साखर उद्योगात महत्त्वपूर्ण स्थान आहे.
15)दक्षिण आफ्रिकेत साखर कशी बनवली जाते?
दक्षिण आफ्रिकेत उसापासून कच्च्या (तपकिरी) साखर म्हणून साखरेवर प्रक्रिया केली जाते आणि नंतर कच्च्या साखरेच्या काही भागावर प्रक्रिया केली जाते आणि शुद्ध (पांढरी) साखर मिळविण्यासाठी डी-रंगीकरण केले जाते.
16)दक्षिण आफ्रिकेत ऊस कोठे पिकतो?
दक्षिण आफ्रिकेत हे पीक पूर्व केप प्रांतातील नॉर्दर्न पोंडोलँडपासून किनारपट्टीच्या पट्ट्यातून आणि क्वाझुलु-नॅटल मिडलँड्सपासून म्पुमलांगा लोवेल्डपर्यंत पसरलेल्या 14 ऊस उत्पादक भागात घेतले जाते. ऊस हे उष्ण हवामान आवश्यक असलेले उष्णकटिबंधीय पीक आहे.
17)उसाची साखर पांढऱ्या साखरेची जागा घेऊ शकते का?
ऊस आणि/किंवा शुगर बीटमधून मिळणाऱ्या उच्च शुद्ध दाणेदार साखरेच्या विपरीत, उसाची साखर केवळ उसापासून तयार केली जाते आणि कमीत कमी प्रक्रिया केली जाते. त्यात थोडे मोठे धान्य आणि गडद रंग आहे, कारण मोलॅसेस शुद्ध केले गेले नाही. दाणेदार साखरेप्रमाणेच उसाची साखर वापरा .
18)ऊस कोणत्या प्रकारची साखर आहे?
सुक्रोज ही उसाची साखर आणि सामान्य स्वीटनर आहे.
19)सर्व दाणेदार साखर शुद्ध ऊस आहे का?
पांढरी दाणेदार साखर एकतर उसापासून बनवता येते (सॅकरम ऑफिशिनारम) किंवा साखर बीट . उसापासून तयार केलेला प्रकार म्हणजे केन शुगर. दोन्ही प्रकारच्या साखरेतील सुक्रोज रेणू सारखेच आहेत, त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या फारसा फरक नाही.
20)मी नेहमीच्या साखरेसाठी नारळाची साखर कशी बदलू?
रेसिपीमध्ये नारळ साखर कशी वापरावी. सर्वसाधारणपणे, नारळाची साखर बहुतेक पाककृतींमध्ये 1:1 गुणोत्तर वापरून पांढऱ्या साखरेची जागा घेऊ शकते, रोझकोव्स्की म्हणतात. तथापि, तिने प्रथम फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडर वापरून नारळाच्या साखरेला लहान कणांमध्ये बारीक करण्याची शिफारस केली आहे.
काळे मिरी आरोग्यासाठी आहेत फायदयाचे जाणून घ्या
रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया
शेतीसाठी उत्तम आहे हा पर्याय-आवळा हे पिक लावा आणि लखपती व्हा !